भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्ह्यामध्ये गळती लागली असून अनेक दिग्गज पक्ष सोडून भाजपात गेल्याने पक्षांतर्गत कलह आणि पक्ष वाचवल्याचे श्रेय वादाच्या लढाईने ग्रासले आहे.
एक वर्षांपूर्वी काँग्रेसचे सर्वेसर्वा अशोकराव चव्हाण यांनी कार्यक्षेला सूचित भाजपा प्रवेश केला आणि काँग्रेस मधील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश देण्याचा चंग बांधला आता भाजप काँग्रेसमुळे झाली असे म्हणत असतील तरी काँग्रेसला मात्र वाईट दिवस आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणी मराठा समाजाचे केवळ काही मोजके कार्यकर्ते राहिले असून मुस्लिम समाज मात्र पक्षाच्या पाठीमागे अजूनही खंबीरपणे उभा दिसून येत आहे तसेच एससी एसटी इतर मागासवर्गीयांचे मागासवर्गीय कार्यकर्ते मोजके दिसून येत आहेत. अशाही परिस्थितीत या ठिकाणी कुणाचा कुणाला पायपुस दिसून येत नाही प्रत्येक जण मी काँग्रेस पक्षाचा वाहक चालक असल्याचेच समजत आहेत त्यामुळे आपसातील मतभेद व अहमपणा नडला असून मीच मोठा कार्यकर्ता आहे असे समजत असल्याने छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी हिरमोड होताना दिसून येत आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षात एकी नसल्यामुळे पक्ष कसा चालवावा कोण चालवावा अजूनही अनुत्तरीत प्रश्न आहे अजूनही कोणता मोठा नेता पुढे येऊन पक्षाची धुरा सांभाळणार अशी परिस्थिती आजतरी दिसत नाही काँग्रेसचे निवडून आलेले खासदार रवींद्र चव्हाण हे राजकारणात नवखे असल्याने त्याचा गैरफायदा ही काही कार्यकर्ते घेत असताना दिसून येत आहे. खासदार पदाची माळ रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात पडली असती तरी राजकारणातील ज्या गाठी असतात त्या गाठी सोडवीण्यास अजून तरी रवींद्र चव्हाण हे प्रगल्भ झाल्याचे दिसून येत नाहीत सध्या तरी अंतर्गत कार्यकर्त्यांचा हेवा आणि श्रेष्ठत्व सांभाळण्यात खासदार रवींद्र चव्हाण यांच्या वेळ जात असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आज महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत रॅली काढलेली दिसून येत आहे या रॅलीच्या निमित्ताने शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर लावल्याचे दिसून येत आहे तरीपण या बॅनर वरती पक्ष संघटन दिसून येत नसून केवळ व्यक्ती प्रभुत्व दिसून येत आहे.
येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून या निवडणुकीची ही पूर्व तयारी असून काँग्रेस पक्षातील विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्याचा हा एक प्रयत्न दिसून येत आहे. गतकाळात महानगरपालिकेवर तसेच जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षाचेच वर्चस्व राहिले आहे आणि अनेक ठिकाणी ग्रामपंचायत, पंचायत समितीवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे हे वर्चस्व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्यामुळे होते असे खा.अशोकराव चव्हाण यांच्या समर्थक बोलून दाखवत आहेत हा सूर कशा पद्धतीने काँग्रेस पक्ष बदलतील याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी ज्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा उत्साह आणि चढाओढ दिसून येत होती ती मात्र आता काहीशी दिसत नाही याच्यातही बदल काँग्रेस पक्षाला करावा लागणार आहे.
तीन महिन्यापूर्वी राजेश पावडे यांना जिल्हाध्यक्ष पदावर औट घटकेची निवड झाल्याने ही अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत राजेश पावडे हे जरी पक्षाला मोठे नेतृत्व नसले तरी कार्यकर्त्यांची नाराजी यामुळे ओढवलेली आहे कारण जो व्यक्ती जिल्हाध्यक्ष पद मिळवतो त्या व्यक्तीची मानहानी जर होत असेल तर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची काय असाही प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडला आहे ज्या पदावर राजेश पावडे यांची निवड झाली होती त्या पदावर असलेले बी .आर.कदम हे नुकतेच भाजपा प्रवेश केले आहेत त्यामुळे या रिक्त झालेल्या पदावर अनेकांनी पाण्यात देव सोडून बसले आहेत हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती बराच परिणाम करणारा विषय आहे.
