Home / राजकारण / रमेश गोडबोले शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर

रमेश गोडबोले शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून नवीन कार्यकर्ते कामाला लागले आहेत परंतु नांदेड शहरातील जुने कार्यकर्ते मात्र अजूनही संभ्रम अवस्थेत दिसून येत आहे याचे कारण असे आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जे फूट पडली आणि दोन दोन गट झाले यामुळे या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रम अवस्था आहे तसेच भाजपाचा जो खांदा पालट झालेला आहे आणि अशोकराव चव्हाण यांनी जे धुरा सांभाळली आणि राष्ट्रवादीमध्ये चिखलीकर यांनी धुरा सांभाळली यामुळे अनेक कार्यकर्ते अजूनही संभ्रम अवस्थेत आहेत
नांदेड शहरातील देगावचाळ,भीमघाट पतरचाळ,खडकपुराचा काही भाग असा प्रभाग असलेला मतदारसंघांमध्ये एकेकाळचे कट्टर विरोधक मानले जाणारे त्यांच्या मधून हवा ही जात नव्हती अशी परिस्थिती असलेले रमेश गोडबोले आणि विलास दाबाले यांचे मात्र अशोकराव चव्हाण यांनी 2017 मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कचरू थोरात यांच्या माध्यमातून मिलन घडवून आणले परंतु दोघांचेही वर्चस्व वाढू नये याची काळजी अशोकराव चव्हाण यांनी घेतली महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना त्यांना न देता त्यांच्या परिवारात तिकीट दिली मात्र या दोघांनाही तिकडे दिले नाही तरीपण या दोघांनी एकाच प्रभागात राहून आपापली उमेदवार निवडून आणलेच परंतु प्रभागातून चारही उमेदवार त्यांनी निवडून आणले. यामुळे अनेक दिवसांपासून असलेले वैर संपल्याचे दिसून येत होते.

अशोकराव चव्हाण हे भाजपा मध्ये गेले असता यावेळेस मात्र या दोघांचीही परिस्थिती बिकट होत गेली रमेश गोडबोले हे काँग्रेसमध्येच आहेत असे दाखवत असले तरी ते या ठिकाणी स्वतःला सुरक्षित समजत नाहीत परंतु भाजपा जायचे नाही म्हणून वेट अँड वॉच ची भूमिका घेताना दिसून येत आहे विलास दाबाले यांनी मोहन हंबर्डे यांच्या सोबत राहून अशोकराव चव्हाण यांच्या सोबत नसल्याचे चित्र निर्माण केले होते परंतु आजच्या घडीला ते अशोकराव चे मानले जातात आणि रमेश गोडबोले काँग्रेसचे मानले जातात परंतु रमेश गोडबोले आता संभ्रम अवस्थेत आहेत की येत्या काळामध्ये अशोकराव चव्हाण सोबत राहिलं तर आंबेडकरवादी चळवळ असलेल्या या भागातून मतदान त्यांना किती मिळेल किंवा मतदार त्यांना स्वीकारेल का असा एक फार मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे त्यामुळे ते अशोकराव चव्हाण यांच्या सोबत जाण्याची शक्यता कमी वर्तविली जात आहे त्यांचा इतिहास पाहिला असता त्यांनी दोनदा प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाकडून आणि लोकभारती पक्षाकडून याच प्रभागातून निवडणूक लढवली होती आणि कमी अधिक फरकाने ते ही निवडणूक हारले होते याचा विचार केला असता ते राष्ट्रवादी चिखलीकर गटाकडे जाण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे यापूर्वीच विलास धबाले यांनी आपली हजेरी लावल्यामुळे हे तिकडे जातील की नाही याची शंका आता प्रभागामध्ये नागरिक व्यक्त करत आहेत कारण अशोकराव चव्हाण यांनी जरी यांचे मिलन घडून आणलं तरी मागच्या काळात सहसा त्यांचं जवळीकता निर्माण झाली नाही अशी चर्चा आहे त्यामुळे हे दोघे एकत्रित राहतील की नाही याची शंका आहे असे जरी झाले तरी युतीचा भाग म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गट, अशोकराव चव्हाण भाजपा आणि शिंदे गट एकत्रित निवडणूक लढवतील आणि यामध्ये तिकिटाचे जे काही समीकरण आहे हे समीकरण या ठिकाणी व्यवस्थित बसेल अशी व्यवस्था तयार करत असल्याचे बोलले जात आहे सध्याला नांदेड दक्षिण मधून पंधरा दिवसात आमदार झालेले आनंदराव बोंढारकर यांच्याशी रमेश गोडबोले यांनी जवळचा साधण्याचा प्रयत्न चालू केला आहे कदाचित ते येणाऱ्या काळामध्ये शिंदे गटाकडूनही आपली उमेदवारी दाखल करू शकतात अशी चर्चा आता प्रभागामध्ये बोलली जात आहे तसेच विलास धबाले हे मोहन हंबर्डे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे आपले उमेदवारी मागण्याची शक्यता वाढली आहे तसेच या प्रभागात असलेले दोन मुस्लिम नगरसेवक आहेत या नगरसेवकांची सुद्धा घालमेल चालू असून हे दोघं काय निर्णय घेतील यावरही त्यांचं बरचस अवलंबून आहे तसा या प्रभागांमध्ये रमेश गोडबोले आणि विलास दाबाले यांचे वर्चस्व असून या दोघांनी जे निर्णय घेतील त्या निर्णयावर बराचसा या प्रभागामध्ये प्रभाव पडू शकतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल